मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील सध्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या जमीन व्यवहार प्रकरणी तुरुंगात आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार मधील 10 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते दहा नेते कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
उद्या प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
मागच्या काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला होता. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अजित पवार, धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख यांना राजीनामा द्यावा लागेल. तर, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेलाय. तर, अजून दोन मंत्र्याची नावं नंतर दिली जातील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर ठाकरे सरकारच्या 10 मंत्र्यानी नैतिकता असेल तर किंवा कोर्टानं आदेश दिला तर राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलंय.
उधारीचा वायदा करणार अन् जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजप नेते किरीट सोमय्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारमधील डर्टी डझन मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यावेळी या सगळ्या मंत्र्यांना एक दिवस राजीनामा द्यावा लागेल असंही त्यांनी म्हटलं होतं. किरीट सोमय्यांनी जाहीर केलेल्या यादीत चंद्रकांत पाटलांनी सांगितलेल्या नेत्यांची देखील नावं आहेत. तसेच ही यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत देखील गेले होते. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात याकडे लक्ष आहे.
आता पुढचं टार्गेट महानगरपालिका! विधानसभा निवडणुका निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने आरोप करीत आली आहे. नवाब मलिक यांच्यावर इडीने कारवाई केली आहे. काही दिवसापासून राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या घरावर देखील केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारमधील मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.
राज्यभर आम्ही लढा उभारू अन् तुमचं जगणं मुश्किल करून टाकू! चंद्रकांत पाटलांचा इशारा
मलिकांचा राजीनाम्यावर दाऊदचा दबाव तर नाही ना ? चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला खोचक टोला
न्यायालयासमोर आणखी किती वेळा तोंडघशी पडणार; ओबीसी आरक्षणावरून सरकारला चंद्रकांत पाटलांचा सवाल