पुणे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे, लोक दिवसाला हजारोच्या संख्येने मृत्यूमुखी पडत आहेत. सततच्या लाँकडाऊनमुळे व्यावसायिकाचे कंबरडे मोडले आहे, लोकांचा रोजगार गेला आहे. जगण्या आणि मरण्याची राज्यात जनूस्पर्धाच चालू आहे. अशा परिस्थीत ही विरोधपक्ष राजकारण करत आहे, राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना सुद्धा सरकार सर्वोपरी मदत करत आहे. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि त्यामध्ये विरोधकांकडून वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या भूमिका यावर परखड भूमिका व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रावादी काँग्रेसच्या तिसऱ्या फळीतील नेतृत्व म्हणून रोहीत पवार यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. कर्जत-जामखेड मतदासंघामध्ये तरुण तडपडार नेतृत्व म्हणून आपली छाप निर्माण केली आहे. २०१९ च्या विधानसभामध्ये आपले वर्चेव विरोधी नेत्याना दाखवून दिले आहे. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले रोहित पवार आता राज्याच्या विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही विरोधकांना खडे बोल सुनावण्यात मागेपुढे पाहात नाहीत. ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि त्यामध्ये विरोधकांकडून वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या भूमिका यावर परखड भूमिका व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थी असताना विरोधी पक्षांनी केंद्राकडे महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडायला हवे, राज्याचे प्रश्न मांडण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरत आहेत. भाषण तर कुणीही करू शकते. पण भाषण करून चालणार नाही, आज जीव वाचवायचे आहेत. राज्यात मुख्यमंत्री आणि सर्व पक्ष मिळून लढत आहेत. पैसे नसूनही उपलब्ध पैसा योग्य पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण केंद्राने जी मदत करायची होती ती केली नाही”, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “लस पुरवठा आणि इतर बाबींची एकंदर आकडेवारी बघता इथल्या लोकांना न्याय देण्यात केंद्र सरकार कमी पडतेय. आणि विरोधी पक्षही राज्याची भूमिका केंद्राकडे मांडण्यात कमी पडतायत. ते केंद्राशी काहीच बोलत नाहीत. त्यांचे तिथे चालत नाही किंवा मोठ्या नेत्यांशी कसे बोलायचे हा त्यांना प्रश्न पडतो, मग ते राज्य सरकारशीच कसे बोलतात.
विरोधी पक्षाने विरोध केलाच पाहिजे जर राज्य सरकार योग्य काम करत नसेल, तर पण त्याच राज्य सरकारला किंवा लोकांना व्हॅक्सीन लागते, जीएसटीचा पैसा अडकतो तेव्हा तुम्ही एकही पत्र लिहीत नाही. या अन्यायाकडे तुम्ही दुर्लक्ष करता का? आधी आपल्या राज्याला अडचणीत आणायचे आणि नंतर तेच भाषणे करतील की बघा राज्य सरकारने काहीच केले नाही”, अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली