पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अनेक नगरसेवकांचा सत्ताधारी भाजपासोबत ठेकेदारीत हस्तक्षेप् आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘कारभारी’अजित पवार यांनी चाबूक हातात घेवून अगोदार आपल्याच पक्षातील नगरसेवकांना वठणीवर आणावे, असा सल्ला माजी आमदार विलास लांडे यांनी वारंवार दिला आहे. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे लांडे यांनी दिलेल्या सल्ल्याला अखेर पुष्टी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यावर पद रद्द करण्याची कारवाई करावी, असा निष्कर्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.
पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
कोरोना काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेला १० लाखांचे मास्क पुरविणा-या एॅडीसन लाईफ सायन्स कंपनीला राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, त्यांचे पती यांनी कंपनीला दिर्घ मुदतीचे कर्ज दिल्याचे निदर्शनास आले. धर यांचा कंपनीशी मास्क खरेदी प्रक्रियेवेळी संबंध असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे धर या महापालिका सदस्य म्हणून पदावर राहण्यास अनर्ह आहेत. त्यांना अपात्र करावे असा स्पष्ट निष्कर्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. परंतु, सुलक्षणा शिलवंत- धरतर फक्त झाँकी आहेत…अनेक नगरसेवक बाकी आहेत… अशी स्थिती पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहे.
योगेश बहल यांना भाजपावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे का?
राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल यांनी गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपाविरोधात रान पेटवले आहे. स्पर्ष प्रकरण, मास्क खरेदी, श्वान नसबंदी घोटाळा असे विषय हातात घेवून धुरळा उडवून दिला आहे. मात्र, आता मास्क खरेदी प्रकरणावरून राष्ट्रवादीच्याच नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना कारवाईला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, शिलवंत या बहल यांच्या प्रभागातील आणि पॅनेलमधील आहेत. त्यामुळे आता योगेश बहल यांना भाजपाच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, योगेश बहल यांचा प्रभागाबाहेर प्रभाव नाही. त्यामुळे विलास लांडे यांच्या नेतृत्त्वाखाली आगामी महापालिका निवडणुका लढवल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील सत्तासंघर्ष
सुलक्षणा धर यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे शिवसेनेचे जितेंद्र ननावरे हे योगेश बहल यांचे निकटवर्ती आहेत. ननावरे यांच्याकरवी बहल यांनी शिलवंत यांचा ‘गेम’केला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सुलक्षणा धर यांनी अल्पवधीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये स्थान मिळवले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुलक्षणा शिलवंत-धर यांनी तिकीट खेचून आणले होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांना माघार घेण्यास सांगितले. परिणामी, राष्ट्रवादीत सुलक्षणा यांचा प्रभाव वाढू लागला होता. त्यामुळे ‘नाकापेक्षा मोती जड नको’या म्हणीप्रमाणे योगेश बहल यांनी सुलक्षणा शिलवंत-धर यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’केला आहे, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. दुसरीकडे, सत्यमेव जयते… देर आये पण दुरूस्त आहे… अशी प्रतिक्रिया देवून जितेंद्र ननावरे यांनी त्याला पुष्टी दिली आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्याची भूमिका…नरो वा कुजरो वा…
केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच, महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचे वातावरण असल्यामुळे प्रशासकीय अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामध्ये राजकीय दबावाला किंचितही थारा नाही. अन्यथा विभागीय आयुक्तांकरवी सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद वाचवण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले असते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका ‘‘नरो वा कुंजरो वा’’आहे. चुकीच्या गोष्टींवर कारवाई करणे हाच त्यांचा धर्म आहे. मग, तो नगरसेवक-पदाधिकारी कोणत्या पक्षाचा आहे, याला आता महत्त्व राहिले नाही.
Read Also :
- नवाब मलिक यांनी झईदा वानखेडे यांचा मृत्यूचा दाखला ट्विट करत पुन्हा माजवली खळबळ
- मोठी बातमी: आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, सताभाऊ खोत यांची घोषणा
- ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
- रविकांत तुपकरांच्या अन्नत्यागाला अखेर यश; शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतले ९ निर्णय
- अखेर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; परिवहनमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा