औरंगाबाद: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारकडून टप्प्या टप्प्याने राबवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे . काही दिवसांपूर्वी मराठवाडा वॉटरग्रीड योजनेवर महाविकास आघाडीतर्फे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तसेच राज्याच्या सिंचन विभागाने मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला थेट विरोध दर्शविला होता . ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अश्या ठिकाणांवरून पाणी कोरडवाहू भागात आणण्याची योजना म्हणून मराठवाडा वॉटरग्रीड योजना चर्चेत आली होती.
हे पण वाचा, मराठवाड्यात भगीरथ अवतरणार, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला मंजुरी
हे पण वाचा, जायकवाडी ३३ टक्के पाणी साठा शिल्लक; रोज होतोय ४५० गावांना चार दिवस पुरेल इतक्या पाण्याचे बाष्पीभवन
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला पैठणच्या जायकवाडी धरणापासून सुरुवात करण्यासाठी व त्याच्यासाठी लागणाऱ्या २८५ कोटीरूपयांच्या खर्चासाठी सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. पैठणनंतर वैजापूर, गंगापूर आणि त्यानंतर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. राज्य सरकारकडून मध्यन्तरी या प्रकल्पाला ब्रेक लावण्यात आला होता मात्र तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारवर ही योजना गूंडाळल्याचा आरोप केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत टप्प्याटप्प्याने ही योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
हे पण वाचा, जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटीचा आराखडा तयार करणार – जयंत पाटील
हे पण वाचा, औरंगाबादचं प्रत्येक घर बदलवणारी ‘पाणी पुरवठा योजना’ कशी आहे? जाणून घ्या…
मराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मराठवाडा ग्रीड योजना अत्यंत महत्वपूर्ण समजली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने या योजनेकरिता २८५ कोटींच्या खर्चाला देखील मान्यता दिली आहे. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, तालुक्यासह बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित भागात ही योजना टप्प्याटप्याने राबविण्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. एकूण पाण्याची उपलब्धता आणि निधीच्या तरतुदीनुसार मंत्रिमंडळासमोर वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहे.
हे पण वाचा,
विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्ष पदासाठी आमदार प्रणिती शिंदेंसाठी मुंबईत जोरदार लॉबिंग
अजितदादा आणि बाळासाहेब थोरात अगस्ती साखर कारखाना चालविण्यास घेणार, असे मी म्हटलोच नाही
नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? आंदोलकांचा आज सिडकोला घेराव
बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश