औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने, स्मारकावर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनाप-भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिली. या जनहिताच्या कामाबद्दल कोणतेही राजकीय मतभेद असतील, तर ते सर्वांनी बाजूला ठेवले पाहिजेत असेही त्यांनी ठामपणे सांगितले. pic.twitter.com/qb9y9HQ0Ui
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2021
त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या…
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत उभारल्या जात असलेल्या ऑरीक सिटीमध्ये औद्योगिक व मनोरंजन क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. यामुळे रोजगार निर्मिती होत असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नियंत्रण कक्षातून या कामाची पाहणी केली. pic.twitter.com/BCDzUxOPJz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2021
मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केले जाणार आहे. यातून महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल. तसेच, १५० निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचे त्यांनी सांगतिले. सोबतच २०० मेगा व्हॉल्ट सौरऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत १८ महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लोकांच्या सेवेसाठी बांधल्या जात असलेल्या या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे व्हायला हवे असेही ते म्हणाले. pic.twitter.com/TkLaCP2YsG
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2021
इतर काही महत्वाच्या घोषणा
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्ग करून, दोन शहरांना जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
- औरंगाबाद-शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
- घृष्णेश्वर सभामंडप उभारणार
- औरंगाबादला पर्यटन समृद्ध
- परभणीत शासकीय महाविद्यालय
- हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
- सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
- औरंगाबादच्या मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये
- परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासाठी ३५० कोटींची तरतूद
- परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेसाठी १०५ कोटी
- उस्मानाबाद शहरासाठी १६८.८१ कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
- हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगासाठी ४.५० कोटी
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराच्या विकासासाठी ८६.१९ कोटी रुपये
- नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकासासाठी ६६.५४ कोटी रुपये
- घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास कऱण्यासाठी वाढीव २८ कोटी रुपये
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/o7XsLTIyGq
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2021
Read Also :
- संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया
- ‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
- ‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?