रत्नागिरी : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस वाहतूक ठप्प असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने आजापर्यंत रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 86 कर्मचऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 24 तासांच्या आत कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र तरी देखील कर्मचारी कामावर हाजर न झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या 86 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 4 हजार 339 इतकी आहे. त्यापैकी 249 कर्मचारी राज्य परिवहन महामंडळात रोजंदारीवर काम करतात. इशारा देऊन देखील कर्तव्यावर हजर न झाल्याने यातील 86 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर देखील निलंबनाची टांगती तलावर आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा धडाका लावला आहे. मात्र तरी देखील जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामावर रूजू होणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
‘पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसेल म्हणून मोदींनी कायदे रद्द केले’;
आज पुन्हा एकदा रोजंदारीवर काम करणाऱ्या राज्यातील एकूण 238 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी 297 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आतापर्यंत राज्यातील एकूण 2776 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामावर रूजू न झाल्यास यापुढेही निलंबन सुरूच राहणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.
Read Also :
- निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच कायदे रद्द करण्याची उपरती; राजू शेट्टींचा लेख व्हायरल
- वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट
- ‘पवार म्हणजे फक्त तडफड, त्यांना कुठेच जम बसवता आला नाही’; निलेश राणेंचे टीकास्त्र
- ‘कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने’, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत
- एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर; वंचित आघाडीचा इशारा