अहमदनगर: सध्या महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावून ते पाळण्याचे जनतेला आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केराची टोपली दाखवली आहे. वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपतीव्यवस्थापनकायदा आणि प्रतिबंधात्मक_कायदा लागू केला आहे. मात्र या नियमांचा भंग करून खा.सदाशिव लोखंडे यांच्यासह सुमारे दोनशे ते अडीचशे जणांनी पिंपरी निर्मळ येथे निळवंडे कालव्यांच्या कामाचे भूमीपूजन कार्यक्रमावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे करण विलास कोळगे यांनी आक्षेप घेतला होता.
या प्रकाराची गंभीर दखल घेवून खासदारांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती .यासंदर्भात कोळगे यांनी लोणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, आण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे, सौरभ शेळके, विठ्ठल शेळके, शिवाजी शेळके, विलास गुळवे, प्रभाकर गायकवाड यांच्यासह दोनशे ते अडीचशे लोकांनी निळवंडे कालव्यांच्या कामाचा भूमीपूजन समारंभ कार्यक्रम केला होता. नगर जिल्हयातील निळवंडेच्या कालव्यांचे पिंप्री निर्मळ शिवारात सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले, मात्र करोना संकट काळामुळे राज्यात संचारबंदी व साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे .
कोरोना काळातील जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुख्य कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो. या कालव्याची निविदा प्रसिध्द होऊन वर्कऑर्डर झाली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार लोंखडे सह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सदस्यही यावेळी हजर होते.