मुंबई : मुंबईत लोकलसेवा सुरू करण्यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत. मात्र राज्यातील ठाकरे सरकारने मुंबईकरांची जीवन वाहिनी असलेल्या लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली असून पुढच्या एक दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय कळेल, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुणे महापालिका मर्जीतील ठेकेदारांवर ‘मेहेरबान’; अन्य ठेकेदाराला डावलण्याचा रचला डाव
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मिठी नदी स्वच्छता प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, लोकल सुरू करण्याबाबत गेल्या दोन आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. पुढच्या एक दोन दिवसात त्याबाबतचा निर्णय कळेल. दोन डोस घेतलेल्यांना केवल लोकलच नाही तर इतर गोष्टीतही सूट देण्यात येऊ शकते. याबाबत काळजीपूर्वक चर्चा करूनच निर्णय घेऊ, असेही ठाकरे यानी सांगितले.
राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
भाजपच्या आंदोलनाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, अन्य देशात कोरोनाची संख्या वाढत आहे. आपल्याकडेही कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता आहे. तिसया लाटेत रुग्णालये भरू नयेत. लोकांना कोरोना होऊ नये याची खबरदारी घेत आहोत, असे सांगत ते म्हणाले की आंदोलन जरूर करावे, पण ही कारणेही समजून घेतली पाहिजे. यात राजकारण करू नये. लोकांचा जीव वाचवणे हे महत्वाचे आहे, असा टोला त्यांनी लगावला.
Read Also :
- “अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या”, नामकरणाच्या वादावरून काँग्रेसची आक्रमक मागणी
- “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात
- मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”