मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रीया पार पडली. या यशस्वी शस्त्रक्रीयेनंतर उद्धव ठाकरे आता घरी परतले असून डॉक्टरांनी पुढचे काही दिवस त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. एकीकडे राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष्य केलंय.
“देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!”
वाघ कोरोनाच्या नावाखाली बिळात जाऊन बसलाय, आता बिळातून बाहेर या असा टोला सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. “तुमच्यात मला वाघाचं एकपण लक्षण दिसत नाही. वाघ डरकाळ्या फोडत बाहेर जातो. पण हा वाघ कोरोनाच्या नावाखाली बिळात जाऊन बसला आहे. आता बिळातून बाहेर या, आम्ही खरा वाघ पाहण्यासाठी उत्सुक आहोत”, असा टोला सदाभाऊ खोतांनी लगावला. ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे महावितरण कार्यालयावर काढलेल्या मोर्चासमोर बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळचे हिवाळी अधिवेशन फक्त ५ दिवसांचे बोलवण्यात आल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत, देशाचे अधिवेशन जर महिन्याभराचे चालत असेल तर महाराष्ट्राचे अधिवेशन फक्त ५ दिवसांचे का असा सवालही खोत यांनी विचारला. या सरकारला आपला भ्रष्टाचार बाहेर येईल अशी भीती वाटत असल्याने सरकार कोरोनाच्या मागे दडत आहे असा आरोप यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
Read Also :
- …म्हणून शिवेंद्रराजे भोसलेंचा अध्यक्षपदावरून पत्ता कट झाला; शशिकांत शिंदेंनी सांगितले कारण
- एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार, पण…: अनिल परबांनी टाकली ‘ही’ अट
- ‘ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळू शकतं’; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला तोडगा
- तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत? विखे-पाटलांचा प्राजक्त तनपुरेंवर घणाघात
- बाळासाहेब ठाकरे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा; ‘या’ नेत्याने केली मागणी