अहमदनगर : कर्जतमध्ये नुपुर शर्मा यांना समर्थन दिल्याने प्रतिक उर्फ राजेंद्र पवार या युवकावर गुरूवारी रात्री 15 ते 20 लोकांच्या गटाने हल्ला केला. भाजपच्या निंलबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून कऱण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्ह्या रूग्णालयात नेण्यात आलं आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर आता अमरावतीसारखेच कर्जत मध्ये घडलेलं आहे. हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हिंदुंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.
आता गुलाल पुढच्याच वर्षी; जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुक प्रक्रिया स्थगित
कर्जतमध्ये एका युवकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आताप्रयत्न चौघांना अहमदनगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. या घटनेत युवक गंभीररित्या जखमी झालेला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले आरोपींवर 549-22 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनुसार नुपुर शर्मा यांचं स्टेटस ठेवल्यामुळे हा हल्ला झाल्याचं समजत आहे.
“राज्यात कुठेही संकट आले तर राष्ट्रवादीची टोपी सगळीकडे दिसायला हवी”
महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी सरकार नाही. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत. महाराष्ट्रात आता शिंदे-फडणवीस हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंवर अत्याचाराच्या किंवा हिंसेच्या घटना घडल्या तर आम्ही हिंदु म्हणुन जशास तसं उत्तर देऊ असा स्पष्ट संदेश मला द्यायचा आहे, असं नितेश राणे म्हणाले.
“आगामी महापालिका, ZP व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल”
आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तर आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं एकलं का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हीही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी जशास तसे उत्तर देऊ, हिंदुंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावायचा प्रयत्न करू नका असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.
Read also
- “हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
- “अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”
- “मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
- “काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
- नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण