केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मुंबईतील आरे कॉलनीबाबत आपले मत मांडले आहे. आरे संदर्भातील प्रश्न हा महाराष्ट्र सरकारचा आहे. आरे संदर्भातील विषय केंद्राकडे आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
आरेचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निर्णय बदलण्यात आला आहे. या संदर्भात मी फक्त दिल्ली मेट्रोचं उदाहरण देतो. दिल्लीत मेट्रो प्रकल्पासाठी जेवढी झाड तोडली. तेवढीच पुन्हा वाढवली. असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या भूमीपूजन जल्लोषात साजरा करण्याच्या वक्त्व्याविषयी जावडेकर म्हणाले, अयोध्येला 5 ऑगस्टला राम मंदिराच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दोन-अडीच वर्षात मंदिराचे काम पुर्ण होईल तेव्हा त्याचा जल्लोष करूचं. जनतेसाठी दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे लाईव्ह होणार आहे.