पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर आता वडेट्टीवारांनी गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी बोलून दाखवली आहे. तसेच, या विषयी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर, सामाजिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावलेले समाजसुधारक अभय बंग यांनी, राज्य सरकारच्या या निर्णयचा विरोध करत निषेध नोंदवला होता. यावर आज मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खोचक भाष्य केले आहे.
“अभय बंग हे एक महान जगव्यापी सामाजिक नेते आणि चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ते महान आहेत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात एकही माणूस तंबाखू खात नाही कि सिगारेट-दारू पीत नाही, त्यांचं एवढं महान कार्य आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे.” असा टोमणा त्यांनी मारला आहे.
आज वडेट्टीवार पुण्याच्या दौऱ्यावर होते. येथे ओबीसी आरक्षणासंदर्भात एक महतवाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयवार भाष्य केले. यावेळी त्यांनी अभय बंग यांच्यावर हे वक्तव्य केलं.
Read Also :
- राजकारण नव्हे; शिवसेनेची विचारधाराच चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर
- जे नक्षलवाद्यांना कळलं ते सरकारला का कळत नाही ? – विनायक मेटे
- मराठा आरक्षणासाठी दिल्ली दरबारी मोर्चा काढावा? संजय राऊत म्हणतात….
- “ठाकरे सरकारमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?”
- वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे