कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या प्रकरणावरून भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सरकारवर टीका करत दादाजी भूसे यांनी माफी मागावी असे म्हटले आहे.
कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या मुलांची माफी मांगा..
आधी शेतकऱ्यांचा आणि आता शेतकऱ्यांच्या मुलाचा अपमान करायचा हे सरकारने ठरवलंच आहे. कृषिमंत्री अधिकाऱ्यांना आधीच निर्देश का देत नाही.@BJP4Maharashtra @dadajibhuse @ANI pic.twitter.com/GayfRPzAwf
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) July 14, 2020
अनिल बोंडे यांनी म्हटले की, गुणपत्रिकेसंदर्भात कृषिमंत्री अगोदरच कुलगुरूंना निर्देश का देत नाहीत ? शेतकऱ्यांचाही अपमान करायचा आणि शेतकऱ्यांच्या मुलांचाही अपमान करायचा असे सरकारने ठरवले आहे का ? कृषिमंत्र्यांनी याबाबत माफी मागणे आवश्यक आहे.
अनिल बोंडे म्हणाले की, या परीक्षांसाठी मुले तयार होती. हा डाग मुलांच्या सातत्याने जन्मभर राहणार आहे की बिना परीक्षेची या मुलांनी डिग्री घेतली आहे. हा डाग लागू नये ही महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही कुलगुरूंनी असे आदेश दिले ते देखील तपासणे गरजेचे आहे.