मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक करण्यात आले आहे. आज सकाळी पनवेल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणावरून आता अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
ट्विटरवर कंगनाने व्हिडीओ शेअर केला असून, त्यात तिने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कंगना म्हणाली की, मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, आज तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरी जाऊन त्यांना मारलंत, त्यांना त्रास दिलात, तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात, अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? तुम्ही अजून किती लोकांचा आवाज बंद कराल, सोनिया सेना किती लोकांचे तोंड बंद करणार? परंतु हा आवाज वाढत जाणार आहे.
Message for Maharashtra government @republic #Arnab #ArnabWeAreWithYou #ArnabGoswami pic.twitter.com/AJizRCitS7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 4, 2020
आमच्याआधीही कितीतरी शहीदांचे गळे चिरण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लटकवण्यात आले आहे. एक आवाज बंद कराल तर आणखी आवाज उठतील. पेंग्विन म्हटले म्हणून राग येतो का ? पेंग्विन दिसता तर पेंग्विन म्हणणारच ना. तुम्ही पप्पूसारखं काम कराल तर तुम्हाला पप्पूसेनाच म्हणतील. सोनिया सेना म्हटल्यावर तुम्हाला राग येतो, परंतु तुम्ही सोनिया सेनेचे लोक आहातच, असे म्हणत कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.