विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ म्हणत टोला लगावला होता. “नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले, “नया है वह… असल्याचा किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला अनुभव नसल्याचा आनंदच आहे. कारण म्हणूनच मी लोकांचा वंश, धर्म, जात, लिंग, पंत्र व राजकीय रंग न पाहता त्यांच्यासाठी काम करत आहे.” अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले होते.
आदित्य ठाकरेंच्या या उत्तरावर अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला कि लोकांना मदत करायला आदित्य ठाकरे कधी बाहेर पडले कि ते मिस्टर इंडियाचे गॅझेट घेऊन बाहेर पडले होते? अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. “आदित्य ठाकरे यांना अदृश्य होण्यासाठी मिस्टर इंडियाचे गॅझेट मिळालेले दिसते, कारण ते वंश, जात, धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी मातोश्री बाहेर पडताना त्यांना कुणी पाहिले नाही, आमच्या माहितीप्रमाणे लोक त्यांना शोधतायत…” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
“आदित्य ठाकरे बाहेर पडले, कोणी नाही पाहिले… मिस्टर इंडिया झाले म्हणून नाही पाहिले… कोणी नाही पाहिले”, अशी कविता देखील भातखळकर यांनी केली आहे
आदित्य ठाकरे यांना अदृश्य होण्यासाठी मिस्टर इंडियाचे गॅझेट मिळालेले दिसते, कारण ते वंश, जात, धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी मातोश्री बाहेर पडताना त्यांना कुणी पाहिले नाही, आमच्या माहितीप्रमाणे लोक त्यांना शोधतायत… pic.twitter.com/MJLMhnpXjN
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 16, 2020
आदित्य ठाकरे बाहेर पडले,
कोणी नाही पाहिले…
मिस्टर इंडिया झाले
म्हणून नाही पाहिले…
कोणी नाही पाहिले@AUThackeray @OfficeofUT pic.twitter.com/K7AhdfTHY4— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 16, 2020