अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे.
कंगना रनौतने दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप केला आहे.
‘करण जोहर यांच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आलं आहे. पण करण जोहर यांना मात्र अद्याप समन्स बजावण्यात आलेलं नाही. का? तर ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत म्हणून? मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह राजपूतच्या हत्येची चेष्टा थांबवावी’
So Karan Johar’s manager is summoned but not @AUThackeray 's best friend @karanjohar !! @MumbaiPolice stop making a joke out of SSR murder investigations.https://t.co/iAQGJzLy2x
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 26, 2020
यालाच जोडून तिने दुसरं ट्विटही केलं आहे. ‘कंगना रनौतच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आलेलं नाही. तिथे मात्र थेट तिला समन्स बजावण्यात आलं. मग करण जोहरच्या मात्र मॅनेजरला समन्स बजावण्यात आलं. मुंबई पोलिसांनी तपासात चालवलेल्या निर्लज्ज नेपोटिझम थांबवावा. करण जोहरला समन्स पाठवण्यात आलं नाही, कारण, साहेब को बुरा लगेगा’ असं सांगून तिने एकप्रकारे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
They won’t call him because he is best friend of @AUThackeray. It’s their government and they shut this case before Kangana’s interview, it’s evident they are protecting their friends.. https://t.co/ZjuuAP9R7O
— Team Kangna Ranaut (@TeamKangna) July 25, 2020