सुशांतचे आत्महत्याचे प्रकरण राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उठली आहे. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्ये मागे राजकारणी नेत्याचे हात असल्याची चर्चा होत होती यातच युवासेना प्रमुख व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे मात्र आदित्य ठाकरे यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘हे गलिच्छ राजकारण आणि तरी पण मी संयम बाळगला आहे’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
करोना संकटाचा हाहाकार असताना महाराष्ट्र सरकारही करोनाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशी आहे. अशात महाराष्ट्र सरकारचे यश अनेकांना खुपते आहे. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणात माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबीयांवर नाहक चिखलफेक केली जाते आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
“सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हे मुंबईचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकाच धक्कादायकही… मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत. महाराष्ट्रातल्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.