मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील,जीपीओ चौकातील निवासस्थानी, तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे, सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले असून, त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून, देशमुखांच्या चौकशी सुरू झाली आहे. त्याच अनुषंगाने हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा, राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी? छाप्यानंतर प्रथमच नेत्यांनी जाहीर केली भूमिका
अनिल देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती. तसंच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.
हे पण वाचा, अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमया यांचे ट्विट
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता, ११ मेला ईडीदेखील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईसीआयर दाखल करत, गुन्हा दाखल केला होता. यांनतर, सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. यात देशमुखांच्या मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्याचाही सामावेश होता.
Another team of Enforcement Directorate (ED) raids former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's residence in Mumbai's Worli area: ED#Maharashtra
— ANI (@ANI) June 25, 2021
हे पण वाचा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी
यांनतर आता ईडीने सकाळी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली असून, ५ अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. दरम्यान, ईडीकडून नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना, ईडीच्या दुसऱ्य़ा पथकाने वरळीच्या सुखदा इमारतीतील घरावरही छापा टाकला आला असून, आता त्याही घराची झाडाझडती सुरु असल्याचे कळत आहे. या दोन्ही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत.
हे पण वाचा, अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात अडकल्यानंतर अनिल देशमुख यांनी ५ एप्रिल रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
Read Also :
- झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या
- राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही?
- काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?
- एरव्ही मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहचणारे महापौर मोहोळ कोठे आहेत?
- गुलाबराव पाटील वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे; रक्षा खडसे म्हणतात….