वर्धा : भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने न्यायासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावले आहेत. मदतीसाठी याचना करणारा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तडस यांच्या सुनेने कुटुंबियांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांकडून आपल्याला बेदम मारहाण होत असल्याचं त्यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. व्हिडिओत त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे मदतीची मागणी केली असून, चाकणकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचा हा व्हिडीओ ट्विट देखील केला आहे.
भाजप खासदाराच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादीकडे केली मदतीची मागणी
दरम्यान, प्रकरणावर आता रामदास तडस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, “मुलगा आणि सूनबाई लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहतात. त्यांची ही वैयक्तिक नवरा-बायकोची भांडणं आहेत. यामध्ये राजकारण कुठून आलं, मला माहिती नाही. त्यांच्या भांडणात मी मध्यस्थाची भूमिका निभावली. मी पूजाला अजूनही सून मानतो. त्यामुळे, दोघांनीही माझ्याकडे राहायला यावं,” असं सांगत, “या सगळ्या प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही,” असं ते म्हणाले.
भावना गवळींच्या ट्रस्टशी संबंधित दोघांना ईडीचे समन्स; मागितली १५ दिवसांची वेळ
“मुलगा पंकज आणि सून पूजा लग्नाच्या सहाव्या महिन्यानंतरच वर्ध्याला जाऊन राहू लागले. त्यानंतर काही काळाने पूजा माझ्याकडे घरी राहायला आली. दरम्यानच्या काळात त्यांचं भांडणं झालं होतं. माझ्या वडिलांना परवानगीशिवाय आपण लग्न केलंय. त्यावेळीच आपलं वर्ध्याला वेगळं रहायचं असं ठरलं असताना, मग आता तू त्यांना त्रास द्यायला त्यांच्याकडे का गेली, असं पंकजने तिला विचारलं. त्यांच्यातली भांडणं मला कळताच मी पोलिसांना फोन लावला. त्यांनी भांडणं सोडवली,” अशी माहिती त्यांनी दिली.
“मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ”- चित्रा वाघ
तसेच, “त्यांनतर मी वर्ध्याहून त्यांच्या घरी पोहोचलो. पण पंकज वर्ध्य़ाला निघून गेला होता. त्यानंतर पूजा माझ्या घरी २ महिने राहिली. पण मीच तिला सांगितलं की, अशी तू इथे किती दिवस राहणार. तू पंकजकडे जायला हवं. त्यांनतर ती वर्ध्याला न जाता तिच्या घरी गेली. यात माझा काहीच दोष नाही. ती अजूनही माझी सून आहे. त्या दोघांनीही इकडे घरी यावं. अशीच माझी इच्छा आहे”, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, यावर रुपाली चाकणकर यांनी, तडस आणि कुटुंबीयांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.
Read Also :
- राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण
- चंद्रकांत पाटलांनी महापालिका निवडणुकीचा शड्डू ठोकला; एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद
- परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
- हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड
- “सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील”, ईडीच्या कारवाईवरून पवारांचा सूचक इशारा