नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर मधल्या निवासस्थानी ईडी-सीबीआय नंतर आता आयकर विभागानं छापेमारी केली आहे. सकाळच्या साडेअकराच्या सुमारास विभागाचं पथक देशमुखांच्या घरी दाखल झालं आहे. त्यासोबतच मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान व त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर देखील आयकर विभागानं छापेमारी केली आहे. या झाडाझडतीत काय हाती लागले आहे याची अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र या छाप्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
ब्रेकिंग! वाझेचा खुलासा, पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी मागितले २ कोटी
ईडीने ५ वेळा समन्स बजावूनही देशमुखांनी चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. तसेच, उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायायलायनेही समन्स रद्द करण्यासाठीची त्यांची याचिका रद्द केली. त्यांनतर त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आल्याची माहिती होती. त्यात आता ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आले आहेत. यात देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे.
परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळून लावली
देशमुखांशी संबंधित ठिकाणी विविध तपास यंत्रणांनी टाकलेल्या धाडी
२५ मेला ईडीने सर्वात पहिली धाड, नागपूर येथील शंकर नगर, छावणी भाग आणि जाफर नगर या ठिकाणी टाकली. त्यानंतर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकण्यात आली. ही कारवाई प्रामुख्याने सागर भटेवार यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली होती.
‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
२५ जूनला ईडीनेच एकाच वेळी तब्ब्ल ८ ठिकाणी धाडी टाकल्या. या थेट देशमुख यांच्या मालमत्तेवर होत्या. त्यांचं वरळी येथील सुखदा इमारतीतील घर, ज्ञानेश्वरी बंगला तसेच एका कार्यलयावर धाड टाकण्यात आली. त्यानंतर त्यांचे सेक्रेटरी संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकून पालांडे आणि शिंदे यांना अटक करण्यात आली, तर देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला
६ ऑगस्टला ईडीने चौथ्यांदा कारवाई केली. याआधी एकदा ईडी त्यांच्या घरी समन्स बजावण्यासाठी गेली असता देशमुख घरी नव्हते. मात्र यावेळी, त्यांच्या ट्रस्ट कार्यलयासह इतर २ ठिकाणी कारवाई केली. पाचवी धाड ही आता आयकर विभागाने घर-कार्यालयांवर टाकली असून, देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर देखील आयकर विभागाने छापे ठाकले आहेत.
‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
दुसरीकडे, सीबीआयने त्यांच्या लीगल टीममधील वकिलाला अटक केली असून, त्यांची चौकशी सुरु आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुखांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. दर महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली देशमुखांनी वाझेला करायला सांगितली आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यासाठी मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी देखील दिली आहे, असे सांगितले होते.
Read Also :
- गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात काय चालू, काय बंद?
- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
- संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया