रत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसं संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता. पर्यावरण खाते मला संपवण्यासाठी दिलं, त्यांना वाटलं मला काही कळणार नाही. प्लॅस्टिक बंदीचा कायदा केला त्यावेळी आदित्य आपण केला आपण केला असं सांगत होते. असं धक्कादायक आरोप बंडखोर आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
“किरीट काका भाजप व शिंदे सरकारने तरी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं”, मिटकरींना डिवचलं
दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसताना देखील ढवळाढवळ करत असत. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचं, गद्दारी याला म्हणतात. मला आश्चर्य वाटतं की, उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असतात. मासाहेब कधीच व्यासपीठावर चढल्या नाहीत. असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे. दापोलीतील शिवाजी महाराज यांचा पुतळा योगेशने बसवला. एकावेळी 90 विकास कामे नगरपरिषदेत सुरु केली होती. विकासाला किंमत नाही का? अजित पवार यांनी पाठवलेल्या खोक्याला किंमत नाही का? आदित्य खोके खोके, गद्दार म्हणत आहेत, परंतु, आदित्य गद्दार तुम्हीच आहात. असा आरोप देखील त्यांनी लावला आहे.
मतदारसंघात एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही : चंद्रकांत पाटील
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली आहे. असा घणाघात शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी केला आहे. तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील रामदास कदमांवर प्रखर शब्दात टिका केली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची सभा अलिकडेच कोकणात पार पडली. त्या सभेत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार म्हणून केला. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून रामदास कदम यांची दापोलीत सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत धक्कादायक भाष्य़ केलं आहे. त्यावरून राज्यात एकच वाद निर्माण झाला आहे.
Read also
- ‘अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है,
- “सोमय्यांच्या आरोपांची तार आज छेडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली”
- “रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करा”; भास्कर जाधवांनी कदमांना फटकारलं
- “संजय राऊतांना सुटका नाहीच”; राऊतांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला
- “राम मंदिराआधी अयोध्यात योगीच मंदिर; काॅंग्रेसचा खोचक टोला, म्हणाले, पहिले 33 कोटी होते, आता..;”