अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ येत्या ३० तारखेला संपणार आहे. त्यानंतर रिक्त होत असलेल्या महापौर पदासाठी, पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. त्यामुळे, आमदार संग्राम जगताप कोणती राजकीय खेळी खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण, राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी देखील नगर मध्ये मात्र सोयीच्या राजकारणाला मोठा भाव मिळतो.
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
“वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?” अहमदनगरच्या महापौर पदाची निवडणूक आता येत्या पंधरवाड्यात कधीही होऊ शकते. त्यामुळे, कोणत्याही क्षणी महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावाच लागणार आहे. अहमदनगरमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला होता आणि सर्वाधिक २४ नगरसेवक असणाऱ्या शिवसेनेला दूर ठेवण्यात आले होते. यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला आरक्षण महापौर पदासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा; ‘या’ दिवशी होणार निवडणूक
या पार्श्वभूमीवर, “पुन्हा योग जुळून आला, तर पुढील काळात एकत्र येऊ. अहमदनगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन आघाडी करायला तयार आहोत”, असं सूचक वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे यांनी केलं आहे. सध्या अहमदनगरमध्ये शिवसेनेचा महापौर आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र, आता विखेंच्या वक्तव्याने नगरमध्ये, भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते
अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेना ‘गॅसवर’ तर काँग्रेस ‘फ्रंटफूटवर’
दरम्यान, शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर आणि शिवसेनेचे इतर नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत. त्यामुळे, हा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप किंवा आणखीन कोणी उपस्थित राहणार का, याकडे नगरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. सध्या अहमदनगर महापिकेत ६८ नगरसेवक आहेत आणि बहुमतासाठी ३४ नगरसेवकांची गरज असणार आहे. ३० तारखेला स. ११ वाजता ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
शिवसेनेने बांधले घड्याळ, राष्ट्रवादीने उचलला बाण, नव्या युतीचा मुहूर्त ठरला
अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना- २३, राष्ट्रवादी-१८, भाजप-१५, काँग्रेस-५, बसपा-४, सपा-१, अपक्ष-२ = एकूण – ६८
Read Also :
- मंत्र्यांनो हा ट्रॅक योग्य नव्हे…; क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
- मंत्र्यांनो हा ट्रॅक योग्य नव्हे…; क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
- शरद पवारांच्या पायाला दुखापत; गाड्या घातल्या थेट ‘रेस ट्रॅक’वर
- “लेकीनेही बापाच्या कामाचा विचार करून, त्याच्या कामाची जाण ठेवली पाहिजे”