अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ नुकताच आता संपणार आहे. महापौर पद रिक्त होत असल्याने पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. अहमदनगरच्या महापौर पदाची निवडणूक आता येत्या पंधरवाड्यात कधीही होऊ शकते. ,महाविकास आघाडीच्या समसमान वाटप कार्यक्रमानुसार महापौर पद शिवसेना पक्षाला जाणार आहे. Ahmednagar Municipal Corporation mayoral election announced
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
हे पण वाचा, “अजित पवार आणि माझी भेट झाली होती मात्र…” राम शिंदे यांनी शब्द फिरवले
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी
अहमदनगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणुकीचा अजेंडा काल रात्री उशिरा तयार झाला आहे . निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती विभागीय आयुक्तांनी केली आहे. तसे नामनिर्देशन पत्र हे महापालिकेतील नगरसचिव कार्यालयामध्ये उपलब्ध होतील. नामनिर्देशनपत्र घेणे आणि दाखल करण्यासाठी सोमवार व मंगळवार (ता. २८ व २९) हे दोन दिवस असणार आहेत. नामनिर्देशनपत्र मंगळवारी (ता. २९) दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करता येतील.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, आमदार निलेश लंकेंच्या दक्षिण स्वारीमुळे दिग्ग्ज नेते हैराण; स्वकीय नेते देखील चिंतातुर अवस्थेत
यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ३०/६/२०२१) सकाळी ११ वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल . त्या अगोदर दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. त्यानंतर नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर वेळप्रसंगी मतदान प्रक्रिया सुरू होईल. महाविकास आघाडी तर्फे शिवसेना पक्षाला महापौर पद देण्यात येईल असे सूचित करण्यात आलेले आहे. मात्र अहमदनगरची राजकीय पार्शवभूमी पाहता काहीही घडू शकते आणि ऐनवेळी तिसरा पर्याय देखील समोर येऊ शकतो.
हे पण वाचा,
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील