अहमदनगर: महाराष्ट्रात कोरोना महामारीने सध्या थैमान घातले आहे. अहमदनगर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित रुग्ण आहे. अहमदनगर जिह्यात गेल्या आठवड्यापासून दिवसाला ३ ते ४ हजार रुग्ण सापडत आहेत. त्यातच रेमेडीसीवर औषधांचा देखील मोठा तुटवडा पडलेला आहे. अश्यातच अहमदनगर जिल्हा नगर दक्षिण चे खासदार सुजय विखे पाटील यांनी गनिमी कावा करत दिल्ली येथून खासगी विमानाने मोठ्या प्रमाणावर रेमेडीसीवर चा साठा अहमदनगर जिल्हयातील रुग्णांसाठी आणला होता. यावरून बरीच टीका टिपणी देखील झाली. रुपाली चाकणकर, मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी देखील केली होती.
खासदार डॉ सुजय विखे यांनी १०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी , सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त / शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे .
विखेंच्या अडचणीत वाढ
आज दि . २६.०४ . २०२१ रोजी, यांनी सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा व अहमदनगर जिह्यातील गरजू रुग्णांना जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या मार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावी अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आली. मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. आर. व्ही घुगे व मा. न्या. बी यु देबडवार यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला परिस्तिथीत जी कायदेशीर कार्यवाही करता अली असती तशी कार्यवाही करण्याचे आदेश दिली. पुढील सुनावणी २ ९ एप्रिल २०२१ रोजी ठेवण्यात अली आहे.
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल …… सविस्तर वाचा
गेल्या आठवड्यात जागतिक महामारीच्या काळात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुख्य कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो. या कालव्याची निविदा प्रसिध्द होऊन वर्कऑर्डर झाली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार लोंखडे सह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सदस्यही यावेळी हजर होते.
हे पण वाचा
‘सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे’ रुपाली चाकणकरांची मागणी