पुणे : काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत, अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यातच आता महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने अजित पवारांच्या मामाच्या कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या मामाचा जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. यावरून पालकमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमने-सामने आले असून दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.
मोठी बातमी! ईडीने केली अजित पवारांच्या निकटवर्तीयावर मोठी कारवाई
सत्तेवर आलेल्या पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव भाजपने केला असल्याचा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. तर दुसरीकडे पहाटेच्या कार्यक्रमाला आलेले अजित पवार पुढच्या तिन दिवसातच अचानक एवढे शत्रू झाले की भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास द्यायला लागले असल्याचे आरोप चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे, अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चांगलीच जुलबंदी रंगली असून दोघेही आमने सामने आल्याचे चित्र आहे.
ED has attached assets of M/s Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana (purchase price of Rs. 65,75,00,000/- in the year 2010) situated at Chimangaon, Koregaon, Satara, Maharashtra under PMLA in a case related to Maharashtra State Co-operative Bank.
— ED (@dir_ed) July 1, 2021
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मामाच्या साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, जरंडेश्वर कारखान्यावर टाच आली हे खरे आहे. मला कारखान्यावर कारवाई झाल्याचं मला माहीत नव्हतं. रात्री मला माहीत झालं. हा कारखाना माझ्या नातेवाईकाचा आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. कायदेशीर प्रक्रिया राबवूनच या कारखान्याची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी टेंडरही काढण्यात आलं होतं. सर्वादिक बोली लागल्यानंतरच कारखान्याची विक्री करण्यात आली होती. त्यासाठी गुरु कमोडिटी या कंपनीने सर्वाधिक बोली लावली होती. सत्तेवर आलेल्या पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव भाजपने केला आहे. स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदा घडलंय, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
“एकाच का? ४३ कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे”- राजू शेट्टी
तर दुसरीकडे चंद्रकांत पाटीलांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या उखाळ्या पाखाळ्या केल्याचे पहायला मिळाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांनी पहाटेचा कार्यक्रम केला. पुढील तीनदिवसानंतर अजित पवारांना काय झालं माहिती नाही, परंतू, त्यांनी भाजपच्या कार्यकत्यांना कारखानदारांना प्रचंड त्रास द्यायला लागले. एवढा त्रास आम्हाला शिवसेनेने सुद्धा दिला नव्हता. कारखानदारांशी भाजपचा काही एक संबंध नसताना त्यांची पारित झालेली बीले अजित पवारांनी सत्तेत आल्यानंतर रद्द केली. अव्वाच्या सव्वा रेट देवून स्वत:च्या दाव्यात घेतली. अजित पवार वरून सांगतात की जेलात गेलेल्या अधिकाऱ्याचा बोलने महत्वाचे नाही, परंतू त्या अधिकाऱ्यांने स्वत:च्या हस्ताक्षराच परिस्थिती मांडली असताना त्याला महत्व देत नसाल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे, त्यामुळे अजित पवारांच्या सीबीआय चौकशीसाठी मी अमित शहांना पत्र लिहिणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे राजकारण तापण्याची शक्यता दिसून येत आहे.
Read Also :
- “मी गेलो तर बला टळेल असं काही लोकांना वाटतं, पण…” फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा
- “केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळणे; हा मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का”
- “एकाच का? ४३ कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे”- राजू शेट्टी
- अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
- “कोणी कितीही आपटली, तरी अध्यक्षपदी महाविकास आघाडीचाच उमेदवार येणार”