अहमदनगर: मागच्या काही आठवड्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत-जामखेडचा दौरा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला होता. माजी पालकमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी राम शिंदे यांच्यात एक गुप्त बैठक पार पडली होती आणि या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने अत्यंत सावध पावले टाकत सर्व घडामोडींवर लक्ष दिले. पत्रकारांनी त्यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांना विचारले असता माझी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटच झाली नसल्याची माहिती दिली होती मात्र आता त्यांनी आपले शब्द फिरवले आहेत.
हे पण वाचा, आमचा जगदंबा साखर कारखाना घेतला, आता अजित पवारांचा तुमच्या विठ्ठलवर डोळा – राम शिंदे
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली भेट झाल्याचे प्राध्यापक राम शिंदे यांनी अखेर मान्य केले आहे. याबात त्यांनी स्वतःच आता स्पष्टीकरण दिले आहे. राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो असल्याचे सांगत वैयक्तिक कारणासाठी भेटलो आहे असे सांगतिले आहे. मात्र ही भेट राजकीय नव्हती तर आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो होतो. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लग्नाला येण्याचे मान्यही केले होते मात्र ऐनवेळी कामामुळे त्यांचा दौरा रद्द झाला अशी माहितीही प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी
हे पण वाचा,राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांना गटविकास अधिकारी मारहाणीप्रकरणी अटक
राज्यात महाभकास आघाडीचे सरकार सध्या सुरु आहे. राज्यात फक्त तीन पक्षाचे सरकार नसून तर तीनही वेगवेगळे सरकार कार्यरत आहेत. कोण मंत्री काय निर्णय घेतोय जनतेला काहीच कळत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्णय कोणताही दुसराच मंत्री घेत आहे हे आपले दुर्दैव आहे. कोणालाही कसलाही ताळमेळ लागत नाहीये. तीनही पक्ष आपापल्या पद्धतीने कारभार करीत आहेत अशी टीका देखील प्राध्यापक राम शिंदे यांनी केली आहे. भाजपच्या ओबीसी आरक्षण बचावतर्फे २६ जून रोजी राज्यात एकाचवेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
हे पण वाचा,
ज्याच्यात धमक आहे, तेच साखर कारखाना चालवू शकतात; अजित पवारांचा राम शिंदेंवर घणाघात
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे