पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून यात काही कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी,क्लेशदायक आहे.अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी,बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही,हे अधिक दु:खदायक आहे.मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली . दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी,क्लेशदायक आहे.अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी,बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही,हे अधिक दु:खदायक आहे.मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 7, 2021
आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशीतून आगीची नेमकी कारणं कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तत्काळ दुर्घटनास्थळी पोहोचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल.पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे.सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणं आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे.यासारख्या घटना भविष्यात घडू नयेत,यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
Read Also :
- ‘आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊनही नको’
- ‘ ट्विटर मोदी सरकारसाठी राजकीय लढ्याचा आत्मा होता; पण…’
- ‘केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडतंय, लसीसाठी आत्मनिर्भर बना’
- ‘भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, विरोध करणारे नतदृष्ट कोण?’
- ‘महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्याने केंद्र सरकारने पुनावालांना तंबी दिली’