मुंबई : एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सारकरवर वर्षाला 600 कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार वाढ देण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांना देतील तो त्यांनी मान्य केला तर एसटी संप सुटण्याची शक्यता आहे.
शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार
दरम्यान राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अगोदर कर्मचाऱ्यांनी स्थानीक पातळीवर संप केला त्यांनतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझान मैदानावर धडकला. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी मुंबईत तळ ठोकून आहेत. सरकारकडून कर्मचाऱ्यांना विविध पर्याय दिले जात आहेत, परंतु कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांसारख्या नेत्यांचा कर्मचाऱ्यांना खंबीर पाठिंबा आहे. राज्यसराकर आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु तोडगा काय निघाला नाही.
रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान 5 हजार तर कमाल 21 हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. गेल्या 10-12 वर्षात नव्याने लागलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी आहे. प्रामुख्याने या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ दिली जाईल. उदा. ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन साडेबारा हजार रूपये आहे, ते साडे अठरा हजार रूपयांच्या आसपास करण्याचा विचार एसटी महामंडळ प्रशासन करत आहे. दुसरीकडे ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन 50 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी वेतन वाढ दिली जाईल.
Read Also :
- पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे, असं मला वाटतयं; चित्रा वाघ यांच विधान
- चार महापालिका पोटनिवडणूकीचा धुरळा; 21 डिसेंबरला पार पडणार मतदान
- आागामी महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा
- पुण्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस; भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन