मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांच्यात चालू झालेला संघर्षावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णयाप्रत येण्यासाठी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. या भेटीतून १२ जणांच्या यादीतील काही नावांबाबत राज्यपालांचा आक्षेप असल्याचे वृत्त आहे.
खडसेंच्या सह आणखी ३ जणांची नावे चर्चेत, कुणाचा पत्ता कट होणार? मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
यातच आता, महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या १२ सदस्यांच्या यादीत बदल झाल्याचं वृत्त असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेमंत टकले यांच्या नावाचा समावेश केला असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीने याआधीच आपल्याकडून ४ नावे दिली होती. त्यानंतर आता आणखी एका नावाचा समावेश यादीत झाल्याने, नेमका कुणाचा पत्ता कट होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”
दरम्यान, त्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले असल्याचे जवळजवळ पक्के झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका नियमाचा संदर्भ देत राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य केलं आहे. “निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करता येत नाही, असा नियम आहे, याची शहानिशा सुरू असून, काही अडचण आली, तर मुख्यमंत्री निर्णय घेतील,” असं त्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
त्यामुळे, बहुप्रतिक्षित आता राजू शेट्टी यांचं नाव वगळलं गेलं आहे का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. तसेच, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे अजूनही या सगळ्यात संभ्रम असून, पक्षाकडून अधिकृत माहिती लवकरच देण्यात येईल, त्यांनतरच यावर भाष्य केले जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे, असे झाल्यास विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबतची कोंडी फुटेल का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जात आहे.
Read Also :
- “शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
- देशमुखांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
- शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करा – अजित पवार
- अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाने केली अडचणीत वाढ
- उद्धव ठाकरेंचा झटका: मंत्रालयातील ३०० ‘पॉवरफुल्ल’ एकाचवेळी अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या