पुणे : गेल्या जवळपास दोन वर्षांपासून देशात महामारीचं संकट थैमान घालत आहे. राज्यात देखील महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन, अनेक नागरिकांचे जीव गेले. राज्य हे मृतांच्या आणि बाधित रुग्णांच्या संख्येत क्रमांक एकवर आलं. मात्र, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतले मंत्री याचं खापर केंद्रावर फोडत आहेत, तर विरोधकांनी याला ठाकरे सरकारचं कसं जबाबदार आहे, हे दाखवण्याचा चंग बांधला आहे. मात्र, यात नुकसान राज्यातल्या नागरिकांचचं होत आहे.
लोकसंख्या पाहता पुणे शहरात दोन महानगरपालिका अस्तित्वात आणणे गरजेचे – रामदार आठवले
दरम्यान, राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. काही प्रमाणात का होईना राज्य आणि केंद्र सरकारने आपली जबाबदारी ओळखून, हातात हात घालून काम केल्याने, राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे. तसेच, लसीकरण आणि निर्बंध यांमुळे देखील हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध अजूनही पूर्णपणे हटवण्यात आले नाहीयेत.
मोठी बातमी! ईडीकडून अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
आज, राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, पुणे जिल्ह्याच्या महामारीच्या आढावा बैठकीसाठी पुण्यात होते, यावेळी त्यांनी, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण प्रदेशांतल्या काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी; पुणे जिल्ह्यात अजूनही तुलनात्मक रित्या बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या सर्व भागांत, सध्या जे निर्बंध लागू आहेत, तेच कायम ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती दिली आहे.
पुणे महापालिकेच्या २३ गावांचा विकास आराघडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला – अजित पवार
यावेळी त्यांनी, संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यायच्या सूचना या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, उद्योगांनी कामगारांना लसीचे दोन्ही डोस देऊन उद्योग सुरू करावेत. महामारीचे प्रमाण कमी झाल्यावर निर्बंध शिथिल करण्यात येतील. सध्या राज्यातील महामारीची स्थिती चिंताजनक आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे काल केंद्रीय पथकाने देखील राज्यातील परिस्थितीबाबत हेच भाष्य केले असून, निर्बंध हटवण्यात येऊ नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.
मात्र, अजून किती दिवस आम्ही असं निर्बंधात राहायचे? याचा परिणाम जगण्यावर होत आहे, याची गंभीरता सरकारला अजूनही लक्षात का येत नाहीये?, सरकार यावर आता कायमसाठीच काही उपाययोजना करून तोडगा का काढत नाहीये, असे सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
Read Also :
- आत्तापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक; दहावीच्या निकालात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क
- पुन्हा एक झटका : अजित पवारांसह अनिल परबांची CBI चौकशी होणार, उच्च न्यायालयात याचिका दाखल
- पुण्यातील सत्ताधारी भाजपला अतिअहंकार भोवणार? विरोधकांनी महापालिका प्रशासनाला धरले धारेवर
- पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर थकीत पैशांप्रकरणी वसुलीची कारवाई
- २०१६ मधील फडणवीसांच्या पराक्रमाचा अजितदादांनी काढला वचपा