मुंबई : हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. मात्र यावर्षीचा दसरा मेळावा काहीसा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आपलीच असल्याचा दावा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जनता कुणाच्या मागे आहे हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यानंतर कळेल, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान
शिवसेना स्थापन झाल्यापासुन शिवसेनचे प्रमुुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभा होत होत्या. बाळासाहेबांनी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितले होते की, ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील. मात्र गेल्या काही काळात ज्या काही राजकीय घटना घडल्या आहेत, त्या सर्वांनी पाहिल्या आहेत. ज्यांच्याकडे सत्ता असते ते हव्या त्या गोष्टी करतात, असा टोला अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
“शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
दसरा मेळाव्यावरून वाद घालुन चालणार नाही. पहिल्यांदा एका पक्षाची सभा होऊल आणि नंतर दुसऱ्या पक्षाची सभा होईल. सर्वसामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतर सर्वांना समजेल. निवडणुका झाल्यानंतर कळेल की खरी शिवसेना कोणाची, असं अजित पवार म्हणाले.
“प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली नसल्याचं सांगितले आहे. अशोक चव्हाण यांनी सांगितलं की भेट झालेली नाही. काँग्रेस त्यांचं काम करत आहे. त्यांना जनता निवडुृन देण्याचं काम करेल, असंही अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते यांच्यात भेट झाली असल्याच्या मुद्द्यावरून म्हणाले.
Read also
- “राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका
- “शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार “; सदा सरवणकर
- “दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
- “राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला