मुंबई : बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत, अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना-काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामावर नाराजी दर्शविली होती. तसेच, त्यांच्याकडून आपल्या पक्षाची कामे होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर गुरुवारी शरद पवार यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे, यावरून सध्या अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, बुधवारच्या बैठकीवर व आजच्या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाच्या दिलासादायक निर्णयांनंतर भुजबळांनी, शायराना अंदाजात दिली पहिली प्रतिक्रिया
‘बुधवारच्या पक्षाच्या आढावा बैठकीत, पराभूत उमेदवारांनी त्यांची भूमिका मांडली. विकास कामासाठी पुरेसा निधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने सत्तेची वेगळी समीकरणे तयार झाली आहेत. पण स्थानिक पातळीवर अजून तेवढा समन्वय नाही. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, नेते या गोष्टी बोलून दाखवतात,” असे मत त्यांनी बुधवारच्या पक्ष बैठकीवर मांडले.
ब्रेकिंग! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांसह ७ जणांची निर्दोष मुक्तता
तसेच, पवार-मुख्यमंत्री भेटीवर बोलताना ते म्हणाले, ”पवार साहेब अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटतात. मात्र आजच्या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा नाही. तसं काही असतं तर, मला, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावलं असतं. पण असं काही नसल्याने ही चर्चा राजकीय नसावी. राज्यभरातून अनेक लोकं येऊन पवारसाहेबांना भेटत असतात. समस्या मांडत असतात. त्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यासाठी म्हणून देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल”, असं ते म्हणाले.
एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते – ED
“शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नसून, हे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर देखील अनेक वेळा पवार साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. ते ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत आहेत. त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. त्यांनी चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. त्यामुळे, राज्यातील लोकांच्या समस्या कानावर घालण्यासाठी त्यांनी भेट घेतली असेल,” असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका मांडताना त्यांनी, “जिल्हा पातळीवर परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे कुणासोबत जायचे किंवा जायचे की नाही याचा अधिकार, त्या-त्या जिल्ह्याला द्यावा. जिल्हा पताळीवर निर्णय घेतला गेला, तर मतविभाजन टाळता येईल आणि अखेरीस त्याचा फायदा निवडणुकांत महाविकास आघाडी सरकारलाच होईल. त्यामुळे, स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
Read Also :
- मिशन २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर; विधानसभा मतदार संघनिहाय अध्यक्ष, पदाधिकार्यांची नावे…
- ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
- राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांकडून महिला सरपंचाला मारहाण; गौरी गायकवाड देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
- राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, कोण घेणार सातव यांची जागा?
- पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार