सांगली : काल मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर असताना, , एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकणसाठी वळते करा, पण आम्हाला वाचावा!” असा टाहो फोडला असता, आमदार जाधवांनी कुत्सितपणे हसत, “तुझा मुलगा कुठंय? ए आईला सांभाळ रे!” असं म्हणत महिलेची चेष्टा केली.
‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले, भास्कर जाधवांना दिला कानमंत्र
तसेच, अजून एका घटनेत त्यांनी, मुख्यमंत्र्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर थेट हात उगारला. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. दरम्यान, सांगलीमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून भास्कर जाधव यांना जोरदार टोला लगावला आहे.
‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले, भास्कर जाधवांना दिला कानमंत्र
“तिथली परिस्थिती नेमकी काय होती मला माहिती नाही. पण मी भास्कर जाधवांना ओळखतो. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केलंय. त्यांनी सांगितलं आहे की, त्या महिला त्यांच्या घरातील नातेवाईक आहेत. आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. ते आपलं कर्तव्य आहे आणि ते पार पाडलं पाहीजे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची बोटीतून पाहणी केली.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2021
राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लीप्सनी, राज्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता?
तसेच, चिपळूणच्या दौऱ्यावर नारायण राणेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कृतीवर प्रचंड संताप व्यक्त केला. मी आणि दोन्ही विरोधी पक्षनेते चिपळूणमध्ये आलो असताना, आम्हाला भेटायला एकही अधिकारी आला नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या संतापाची दखल घेत, उपमुख्यमंत्र्यांनी आता नोडल ऑफिसर नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे.
भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचं उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीनं तपासण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2021
‘त्या’ घटनेवर महिलेने सोडले मौन; भास्कर जाधवांनीही दिली प्रतिक्रिया, म्हणतात…
मात्र, “जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. ते आपलं कर्तव्य आहे आणि ते पार पाडलं पाहीजे”, असं म्हणणारे अजित पवार आता या हवालदिल झालेल्या जनतेला दिलेली आश्वासनं किती वेळात पूर्ण करतात? हा नुसता हवेत गोळीबार होता की खरंच या सरकारला या सर्वांप्रती सहानुभूती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांत समोर येतीलच.
Read Also :
- सातव कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण, राहुल गांधींची भेट घेऊन केला आनंद द्विगुणित
- फडणवीसांचे भास्कर जाधवांना शालीतून जोडे, तर महाविकास सरकारला मोलाचा सल्ला
- राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार – अजित पवार
- खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
- “चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन