रायगड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमुळे राष्ट्रवादीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक केली. ‘निवडणुकीमध्ये यश आणि अपयश असतं. सगळेच निवडणूक येतात अशातला भाग नाही’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
अमरावती हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरूच; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ४ जणांना अटक
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगड फिरकावला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पत्रकारांनी अजित पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘ही घटना घडल्यानंतर मी ताबडतोब पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, ५ ते ६ लोक होती, त्यांना लगेच काही जणांना ताब्यात घेतले आहे. आता त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. के कोण होते, त्यांनी हे कृत्य का केले याचा तपास करत आहे’ अशी माहिती अजित पवारांनी दिली.
“…यांचं म्हणजे अति शहाणा त्याच्या बैल रिकामा असं झालायं..!”
तसंच, कोणत्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश असतं. सगळेच निवडणूक येतात अशातला भाग नाही. तिथे जी निवडणूक झाली तिथे राष्ट्रवादीत बंडखोरी होती’ अशी कबुली अजित पवारांनी दिली. ‘मुळात ती काही पक्षिय निवडणूक नव्हती. तिथे जे काही पॅनल होते त्यात इतरही राजकीय पक्षाचे आमदार आणि खासदार तिथे होते. सहकारातील निवडणूक ही पक्षीय स्तरावर लढवली जात नाही. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक संस्था चांगली चालावी या दृष्टीकोनातून ही निवडणूक चालत असते’ असंही पवार म्हणाले.
पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याची चर्चा ?
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा? शरद पवारांच्या परबांना महत्वाच्या सूचना
- “महाराष्ट्र केंद्रशासित करा आणि केंद्राला चालवायला द्या”; प्रीतम मुंडे कडाडल्या
- पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
- अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
- शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, नुस्त खेळवत ठेवतात; नारायण राणेंचा घणाघात