पुणे : एकीकडे कोरोना महामारीसोबतच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्याच्या जगण्याचे आर्थिक गणित बीगडत चालले आहे. त्यातच दुसरीकडे भाजपचे नेते आणि नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे अवधूत वाघ यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्याच्या ओघात त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा शालिवाहन यांच्यासोबत केली आहे.
नगरसेवकांची मज्जाच मज्जा; ऐन निवडणुकीच्या तोंडावर रखडलेली कामे मार्गी लागणार
आपल्या ट्विट मध्ये वाघ म्हणतात कि “जसं राजा शालिवाहन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर शक सुरु झालं, नव युग सुरू झालं. तसं २०१४ पासून भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे शक अर्थात युग सुरू झालं. या शककर्त्या नरेंद्र युगात आपण रहात आहोत ही आपणा सर्वांसाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे, अशा पद्धतीचे तुलना अवघूत वाघ यांनी केली आहे. त्यामुळे, या ट्विटवर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत वाघ यांच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
जसं राजा शालिवाहन व छ. शिवाजी महाराज यांच्यानंतर शक सुरु झालं, नव युग सुरू झालं तसं २०१४ पासून भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांचे शक अर्थात युग सुरू झालं
या शककर्त्या नरेंद्र युगात आपण रहात आहोत हि आपणा सर्वांसाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे.#नरेंद्रयुग pic.twitter.com/2XU8IvBbPo— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) August 12, 2021
एकीकडे कोरोनाचे संकट जाता जाईना तर दुसरीकडे पेट्रोल – डिझेल यांसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यांच्यासमोर रोजी-रोटीचा प्रश्न उद्भवला असताना मोदींची शिवाजी महाराज आणि शालिवाहन यांच्याबरोबर तुलना करणे कितपत योग्य आहे?, असा प्रश्न आता शिवप्रेमी विचारत आहेत. कोणीकडे ते जनतेचे, रयतेचे राजा आणि कोणीकडे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे भाजप नेते, असे सांगत शिवप्रेमींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
Read Also :
- “…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे
- कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
- “मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी