नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री शिवसैनिक असतानाही नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सेनेला गळती लागली आहे. वर्षभरात तीन तालुका प्रमुखांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही सेनेसाठी धोक्याची घंटा असून असेच सुरू राहिले तर रामटेक लोकसभा मतदारसंघही गमवायला वेळ लागणार नाही, असे मानले जात आहे.
हे पण वाचा: निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने प्रस्ताव पाठवावा; मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव मागितला होता का?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनेत उत्साह निर्माण होईल, युतीच्या जोखडातून सुटका झाल्याने भाजपचा दबाव झुगारून विस्तारलाही मोठा वाव मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात नवे चेहरे शिवसेनेने दिले. त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होताना दिसत आहे.
हे पण वाचा: ‘राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’ – संजय राऊत
शहरात मोठी फूट पडली आहे तर ग्रामीणमध्ये गळती लागली आहे. भिवापूरचे तालुका प्रमुख शेखर दडमल आणि कुहीचे तालुका प्रमुख हरीश कडव काँग्रेसवासी झाले आहेत. एकेकाळी शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य तापेश्वर वैद्य आधीच शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर शिवसेनेचे सहयोग सदस्य होण्याची वेळ ओढवली आहे.
हे पण वाचा: “वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
दिवसेंदिवस शिवसेनेतील खदखद वाढत चालली
दिवसेंदिवस शिवसेनेतील खदखद वाढत चालली आहे. शासकीय समित्यांवर नेमणूक केली जात नाही. काँग्रेसची कुरघोडी सुरू आहे. सत्ता असतानाही कामे होत नसल्याने त्यापेक्षा काँग्रेस बरी अशी भावना शिवसैनिकांमध्ये बळावत चालली आहे. त्यामुळे पक्ष सोडणाऱ्यांची संख्या आणखी वाढलेली दिसेल असे एका निष्ठावंताने सांगितले.
हे पण वाचा: निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
समित्या वाटपाचे सूत्र ठरले असतानाही पालकमंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार शिवसेनेला प्रतिनिधित्व देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तालुका प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत आघाडी कायम असतानाही काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा करण्याचेही टाळले. शेवटपर्यंत झुलवत ठेवले. अखेर शिवसैनिकांनी स्वबळावर अर्ज दाखल केले होते.
Read Also :
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?
- “अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनीषा कायंदे यांची खोचक टीका
- ‘ईडब्ल्यूएस’साठी घटनात्मक तरतूद शक्य मग मराठा आरक्षणासाठी का नाही? अशोक चव्हाण यांचा फडणवीसांना प्रश्न
- पुणेकरांच्या मदतीने कोरोनाची लढाई जिंकण्याचे बळ मिळाले: महापौर मुरलीधर मोहोळ