मुंबई : सध्या केंद्र सरकारला पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. संसदेतही याचे पडसाद जोराने उमटत असून, या प्रकरणावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, ही मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्याने आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी, आज विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील महाविकास आघडीसह इतर १४ पक्षांचे नेते उपस्थित होते.
राज्य सरकारकडून १४ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरु
यावेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, “पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. मोदी सरकारला याचं उत्तर द्यावच लागेल,” असा इशारा दिला, तर मल्लिकार्जुन खरगे यांनीही, “संसदेत या विषयावर चर्चा व्हावी,” अशी मागणी केली आहे. “पेगासस प्रकरणाची अनेक देशात चौकशी होत आहे, मग भारतातच का होत नाहीये? पंतप्रधानांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजेत,” असं म्हटलं आहे.
“फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”
Sitting with the entire opposition is extremely humbling. Amazing experience, wisdom and insight in everyone present.#United pic.twitter.com/w74YRuC3Ju
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 28, 2021
या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते, शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत, सरकारला १० दिवसांची नोटीस देण्यात येईल, त्यावर राहुल गांधींची सही असेल, असे ठरले आहे.
…अन् देवेंद्र फडणवीस दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसले जेवायला!
दरम्यान, पेगासस प्रकरणावरून संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे प्रकरण लावून धरले आहे. काही गोंधळी सदस्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवर आणि मीडिया गॅलरीच्या दिशेने कागद फेकले. संसदेत जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. वारंवार संसदेचं कामकाज तहकूब करावं लागत असल्याने १० गोंधळी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडून आणण्याची शक्यता आहे.
Read Also :
- पुण्यातील रिंग रोडसाठी कोणत्याही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही; एकनाथ शिंदे यांची माहिती
- मोठी बातमी: संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या अंगावर कागद फेकले; १० खासदार निलंबित होणार?
- खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांची होणार SIT चौकशी, ७ अधिकाऱ्यांच्याद्वारे केला जाणार तपास
- भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु
- नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला; राहुल गांधीचा पेगाससवरून हल्लाबोल