सांगली : राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस चालूच आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे तर विविध भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहे. अनेक लोकांचे कुटुंबांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. घर,संसार पूर्ण नामशेष झाले आहे, अनेक मंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्याच ठिकाणी आज राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. तेव्हा त्यानी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे आणि खासदारांचे एक महिन्यांचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे, अशी घोषणा केली.
भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
सांगलीचा हा पूर मनुष्यनिर्मित नाही. कोयनेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यात आले होते. राज्य आपत्ती निवारण दलाची एक टीम कराडला ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. यासोबतचं रायगड आणि रत्नागिरी भागात देखील ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, व सर्व घटनाग्रस्त ठिकाणी हवी ती मदत पाहोचवली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका
कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झालंय रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या मागण्या ऐकुन घेतल्या आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचं काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही. दोन दिवसांत पूरस्थितीचं चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मिळून आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
Read Also :
- खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
- “चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लीप्सनी, राज्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता?
- ‘त्या’ घटनेवर महिलेने सोडले मौन; भास्कर जाधवांनीही दिली प्रतिक्रिया, म्हणतात…
- कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव