मुंबई : राज्यातील सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्वश्वभुमिवर राज्यातील शाळा, महाविद्यालयं बंद होती. राज्य सरकारने टप्या टप्याने वर्ग सुरु केले. या अगोदर ग्रामिण भागात ५ ते १२ पर्यंतचे वर्ग आणि शहरी भागात ८ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरु होते. आता संपुर्ण महाराष्ट्रातील १ ते १२ चे वर्ग सुरु करायला देखील राज्य सराकारने परवानगी दिली आहे. येणाऱ्या काळात आम्ही चर्चा करू. उद्या अधिकाऱ्यांशी बोलू, आठ दिवस आम्ही पालकांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करु आणि विद्यार्थांना सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर देऊ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचा पण गिरणी कामगार करणार का? संजय राऊतांचा हल्लबोल
दरम्यान राज्यातील सर्व शाळा तब्बल दोन वर्षानंतर सुरु होणार आहेत. येणाऱ्या ८ दिवसात आम्ही तज्ञ, अधिकारी यांच्याशी चर्चा करुन योग्य त्या SOP जाहीर करु अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. निवासी शाळांबाबत आम्ही लवकर निर्णय घेऊ त्याचबरोबर दिवाळीनंतर काय परिस्थिती आहे हे पाहून आम्ही हा निर्णय घेतला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. येत्या आठ दिवसात संपुर्ण तयारी करु जेणे करुन काही अडथळा येणार नाही, आणि विद्यार्थांनाही सुरुक्षीत वातावरण मिळेल यासाठी आठ दिवसात योग्य नियमावली जाहीर करु अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
माझा पराभव झाला, म्हणून कट कारस्थान करणाऱ्यांनी धिंगाणा घातला; शशिकांत शिंदेंचा आरोप
सध्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पहिल्या लाटेनंतर शाळा सुरु करण्यात आल्या होत्या मात्र राज्यात दुसऱ्या लाटेदरम्यान पुन्हा रुग्ण वाढू लागले आणि पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला. सध्या राज्याच्या शहरी आणि ग्रामिण भागात रुग्णसंख्या कमी झाली आहे आणि बऱ्याच लोकांचं लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती की लहान मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, त्यामुळे लहान मुलांचेही लसीकरण लवकरात लवकर होईल असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय? संजय राऊतांचा सदावर्तेंना रोखठोक सवाल
- आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; हिंगोलीतील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘तुटेपर्यंत ताणू नका, एकदा तुटलं तर जोडणार नाही’; अनिल परब यांचा इशारा
- स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला झटका; राष्ट्रवादीने उचललं मोठं पाऊल..
- ‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब