पुणे : ताळेबंदीच्या नियमांमध्ये हळूहळू शिथिलता महाविकास आघाडी सरकार आणत असताना आता महाराष्ट्रातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता शाळकरी मुलांना शाळेत जावं लागणार आहे. जवळपास आठ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात परवा इयत्ता ९ वी पासून पुढच्या वर्गातील शाळा सुरू होतायेत. कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही.
मात्र पुण्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा बंदच ठेवण्यात येतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापौर मोहोळ म्हणाले की, पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील शाळा बंदच ठेवणार !
पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 21, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्यामुळे मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावरून पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याच मुद्यावरून ठाकरे सरकारवर भाजपने निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?, असे ट्विट करत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
Read Also :
हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणून ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला नाही: देवेंद्र फडणवीस
मोदी सरकारने ‘सीबीआय’ची पानटपरी केली आहे, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची टीका
तृणमूल काँग्रेसचे ५ खासदार भाजपप्रवेशाच्या तयारीत, ‘या’ भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
…म्हणून आमदार रोहित पवारांनी शाळकरी मुलांना धीर देत दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री ठाकरेंना बॉलिवूडची तर आदित्य ठाकरेंना पब,बारची चिंता, आशिष शेलार बरसले…