अकोले: निवृत्त अधिकारी बी. जे देशमुख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन अगस्ती साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर आर्थिक अफरातफरी बद्दल गंभीर आरोप केले होते. संचालक मंडळ हे नुसतं मंडळ नसून ती एक टोळी आहे असा आरोप करत अगस्ती साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. तसेच जिल्हा बँकेने अगस्ती कारखान्याला कर्ज देऊ नये यासाठी देखील अर्ज केला होता. राज्य सरकारने अगस्ती कारखान्यावर चौकशी समितीची स्थापना करावी आणि चौकशी करावी असे देखील पत्र राज्य सरकारला लिहले होते.
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
यावरून अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाने तडकाफडकी आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहे. सीताराम गायकर यांनी कारखान्याचा अहवाल मांडताना हा कारखाना संचालक मंडळाने किती अडचणींमधून चालवला हे विशद केले आहे. आम्ही कारखाना अत्यंत सक्षमपणे चालवीत असताना काही मंडळी जाणून बुजून शेतकरी, बँक आणि सरकार ला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही जर चौकशीत दोषी आढळलो तर सर्व संचालक जबाबदार राहून भरपाई देऊ असा इशारा जेष्ठ संचालक सीताराम गायकर यांनी दिला आहे.
हे पण वाचा, शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
हे पण वाचा, नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
तुमच्यात जर हिंमत असेल तर माझा देखील राजीनामा घ्या. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही काम करत आहोत. यापूर्वी चुकीचा पद्धतीने कारखाना चालवला गेल्याने बंद पडला होता. मात्र आम्ही तो मोठ्या नेटाने उभा केला. तालुक्यातील काही मंडळी हा कारखाना बंद पाडून विकण्यासाठी सरसावली आहेत. खोटे नाटे अर्ज देऊन कारखाना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या करीत आहेत. ज्यांनी कधी पिठाची गिरणी देखील चालवलेली नाही अश्यानी आम्हाला शिकवू नये अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मंत्री आणि अगस्तीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली आहे.
हे पण वाचा,
कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
नागपूर: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही