मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, यामुळे आता काही ठिकाणी महाविकास आघाडीत असलेले अंतर्गत मतभेदही उघड होत आहेत. तसेच अद्यापही राज्यात कोणाची कोणाशी युती होणार आणि कोण कुणाशी आघाडी करणार याची देखील शाश्वत अशी कल्पना नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भुजबळांच्या ‘त्या’ इमारतीचे खरे मालक सांगा! मुख्यमंत्री आणि शरद पवारांना सोमैय्यांचे चॅलेंज
शरद पवार रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठकीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मंत्र्यांच्या कामाचा आणि त्यांच्या विभागाचा आढावा घेतला. ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या या निवडणुकांना ठाम विरोध केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, “यावेळी निवडणुकीत एक निश्चित रणनीती आखूनच पुढे गेले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल, अश्या आघाड्या आणि कृती आपल्याकडून होणार नाही याचे नियोजन केले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.
महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाचे मंत्री, पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्या कामाबाबतचा आढावा तसेच पक्षसंघटना बळकट करण्यासाठीच्या ध्येयधोरणांवर साधकबाधक चर्चा बैठकीत करण्यात आली.@PawarSpeaks #NCP #Meeting pic.twitter.com/Kh0hP5i6RF
— NCP (@NCPspeaks) August 31, 2021
तसेच, “पक्षाच्या प्रत्येक नेत्याकडे एकेका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल. त्यात शिवसेना किंवा काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याबाबतचे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येतील. मात्र ते घेण्याआधी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली जाईल. तसेच, हे निर्णय स्थानिक पातळीवर परिस्थिती काय आहे? त्यानुसारच घेतले जातील पण उगाच आघाडीत बिघाडी होईल अशा पद्धतीने कोणतीही कृती करू नका,” असे स्पष्ट आदेशही त्यांनी दिले आहेत.
“राष्ट्रपतींनी राज्यपालांची चौकशी करावी, त्यांच्यामुळे राष्ट्राला व संविधानाला धोका”- बच्चू कडू
त्यांच्या या सुचनेने नक्की महाविकास आघाडी होणार की युती पाहायला मिळणार? या चर्चांना पूर्णपणे विराम मिळाला आहे. दुसरीकडे याबाबदल देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं. तेव्हा, त्यांनीही ओबीसींचं आरक्षण मिळाल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या निवडणूका होता कामा नये, असं आमचं ठाम मत आहे. आता सरकारने ते करायचं की नाही हे त्यांनीच ठरवावं. मात्र, निवडणूका घेण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही तीव्र आंदोलन करू,” असे त्यांनी सांगतिले.
Read Also :
- महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी? दिलीप मोहिते-पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर
- “…तर देशात लसीकरण शक्य नसतं आणि देश कायमच्या लॉकडाऊनमध्ये गेला असता” – फडणवीस
- राणे-सेना वादानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप!
- “…तर ५ सप्टेंबरला जलसमाधी घेऊ,” राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; पंचगंगा परिक्रमा सुरू
- मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया