कोल्हापूर: कोरोनाने राज्यात थैमान घातले होते. त्यामुळे वारंवार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावावा लागला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा देखिल अपवाद नाही. अशावेळी भाजीपाला विक्रेत, छोटे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. अशातच त्यांच्याकडून विज बील आणि घरफाळा सारखे कर वसूल केल्या जात आहे. कोरोना काळात आर्थिक घडी कोलमडली असताना विज बील आणि घरफाळा कर वसूलीत सुट देवून कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे माजी विधानसभा सदस्य अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
कोविड माहामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेकवेळा लॉकडाऊन लागू करण्यात आले. याचे सत्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. याबाबीला कोल्हापूर जिल्हा देखिल अपवाद नाही. मात्र याच्या परिणामस्वरूप जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी उद्योजक आणि सर्वसामान्य जनता अडचणीत आले आहे. लॉकडाऊन काळात शिरोळच्या शेतकऱ्यांना त्यांचा मौल्यवान भाजीपाला फेकून द्यावा लागल्याचे वृत्त आपण पाहिले असेलच. व्यापारी लोकांचेही व्यावहारिक गणित कोलमडले आहे.
हे पण वाचा, कोल्हापुरात गोकूळनंतर आता कोरोनाच्या मुद्द्यावरून महाडिक – पाटील गट आमने सामने
अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील हे घटक अडचणीत सापडले आहेत. तरीही त्यांच्याकडून सक्तीने वीजबील व घरफाळा सारखे कर वसूल केले जात आहेत. दैनंदिन खर्च भागवणे अवघड होत असताना हे लोक हा खर्च कसा करणार, हा प्रश्न आहे. अशावेळी सरकार म्हणून आपण शेतकरी आणि व्यापारी घटकांना वीजबील व घरफाळा यामध्ये सुट देवून दिलासा देण्याची कार्यवाही करावी, असे महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
हे पण वाचा,
सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा