मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा टप्पा अलिकडेच तब्बल दीड महिन्यानंतर पार पडला. यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 असे एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतु त्या मंत्र्यांचं अद्यापही खातेवाटप करण्यात आलं नाही. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल गोटे यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर खोचक टिप्पणी केली आहे.
“75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
अनिल गोटे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मंत्रीपदे मिळाली, त्यांस तीन दिवस उलटले. अजून खाती मिळाली नाहीत. मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिल्यानंतर दुसरी अपेक्षा तरी काय ठेवायची. लाचारी, लाळघोटेपणा, नाक घासणे, अस म्हणत ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची तर मुंबई शहराचे अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली. त्यावर बोलताना ते म्हणाले की, चंद्रशेखर बावणकुळे व आशिष शेलार हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावडीचे, व अमित शाह यांच्या जवळचे आहेत. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘जागा व लायकी’ दाखवून दिलीय, असेच दिसतेय. असं म्हणत त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे.
“इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला जातो. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना पक्षातील पदे सोडावी लागणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र, आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
चंद्रशेखर बावणकुळे व आशिष शेलार हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावडीचे, व अमित शाह यांच्या जवळचे. शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘जागा व लायकी’ दाखवून दिलीय, असेच दिसतेय.@ShelarAshish @cbawankule
— Anil Gote (@anil_anna_gote) August 12, 2022
Read also
- “बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”
- बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
- “..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
- “चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा