मुंबई : गेले तीन दिवस राज्यातील भाजपचे पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यात महत्त्वाच्या बैठका आणि चर्चा होत असून, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना लवकरच वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, भाजपमध्ये देखील या अनुषंगाने मोठा बदल घडण्याचे संकेत दिले जात आहेत.
राज ठाकरेंसोबत बैठकीतला ‘निरोप’ दिल्लीत पोहोचला; चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा
दरम्यान, काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप राज्य पदाधिकाऱ्यांसह, अमित शहांकडे भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी ती नाकारली असल्याचे समजत आहे. त्यामुळे, काही दिवसांपासून महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणारच्या चर्चा सुरू आहेत, त्यांना हवा मिळाली असून, राज्य संघटनेतील प्रमुख व्यक्तीला अमित शहांनी भेटण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना देखील उधाण आले आहे.
अमित शहांनी टाळली चंद्रकांत पाटलांची भेट, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिकच उधाण
यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, “राज्यातील नवीन आणि जुन्या मंत्र्यांची भेट व्हावी अशी प्रथा पक्षात आहे. त्याप्रमाणे सर्व मंत्र्याच्या भेटी झाल्या. त्यांना शुभेच्छा देऊन काम जाणून घेतले. त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला काय आणि कसा फायदा होईल हे जाणून घेतले. नड्डा यांची भेट घेणे ठरले होते, पण पंतप्रधान आणि अमित शहा यांच्याकडे आमचे काही काम नव्हते”, असे सारवासारवीचे उत्तर देऊन त्यांनी ही भेट न होण्यामागचे स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्रालयात झाली गटारी? मोठ्या प्रमाणात सापडल्या दारूच्या बाटल्या…
दुसरीकडे, त्यांनी दिल्ली दौऱ्यावपूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा, दिल्लीत पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांना भेटून राज्यातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल”, असं सांगितलं होतं. तसेच, आशिष शेलार आणि फडणवीसांनी अमित शहांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ काळ चर्चा केली ,पण पाटलांशी भेट नाकारली गेल्याने, त्यांच्याकडे काही काम नव्हतं, हे सांगून त्यांनी वेळ मारून नेली असल्याचे स्पष्ट होत आहे.
Read Also :
- प्रताप सरनाईकांनाच्या कामाशी बरोबरी करून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
- मोठी बातमी : अकरावीची सीईटी परिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द; राज्य सरकारला धक्का
- महादेव जानकरांचा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, म्हणाले “आता त्यांनी ठरवायचं दुसऱ्यांच्या घरात…”
- “मग हा टाइमपास कशाला?”; सुप्रिया सुळेंवर निलेश राणे यांचा जोरदार घणाघात
- मंत्रालयात आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करा!