अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी आता जागा वाटपाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सोबतच, भाजप-शिंदे गटातही याबाबतची कुजबुज सुरू झाली आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अपक्ष आमदार बच्चू कडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यासंदर्भात संकेतही दिले आहेत.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात लोकं जेवणावर तुटून पडली, अन्नाची प्रचंड नासाडी”
मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने नवनीत राणा यांच्यासाठी अमरावतीची लोकसभेची जागा सोडली होती. यानिवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू उभे राहिले होते. यातच आता पुन्हा एकदा अमरावतीची जागा लढविण्यावर बच्चू कडू ठाम आहेत. त्यामुळे सध्या भाजप-शिंदे गटात असलेले बच्चू कडू त्यांच्यात युतीत असलेल्या नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
हेही वाचा…“जनतेच्या पैशातून भाजप-शिवसेनेचा प्रचार”, काॅंग्रेसची सरकारवर जहरी टिका
आम्ही अमरावतीची जागा लढवणार आहोत. त्यासाठी तयारीही झाली असून मी स्वत: अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढलो होतो. अपक्ष म्हणून मी लढलो होतो. कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा प्रत्यक्ष पाठिंबा नव्हता. तरीही मी फक्त पाच हजार मतांना पडलो होतो. त्यामुळे ही जागा आम्ही सोडणार नाही. या मतदारसंघात कुणाशीही फाईट झाली तरी आम्ही लढू. अस बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत बच्चू कडू १५ ते २० जागा लढविणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील मेहगाव आणि अचलपुर विधानसभा मतदारसंघ, वाशिम, नागपुर, नाशिक आणि सोलापुर येथील प्रत्येकी एका मतदारसंघाची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. आम्ही निवडक मतदारसंघावर लक्ष दिलं आहे. राज्यभर लक्ष देणार नाही. पण ठरावीक ठिकामी लक्ष देणार. अमरावतीवर आमचा अधिका फोकस राहील असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार ? अपात्रतेच्या कारवाईला वेगाने हालचाली
हेही वाचा…काॅंग्रेसमधून निलंबित, फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपात येण्याच्या बातम्या, आशिष देशमुख म्हणाले, “माझी राजकीय आता वाटचाल…”
हेही वाचा…“संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा, त्याला नसबंदी…” सजंय शिरसाठ यांचा राऊतांना टोला
हेही वाचा…“शिंदेंच्या सभेसाठी अधिकाऱ्यांना ५० हजार, १२ हजार, ६ हजार देण्याचे आदेश”, ठाकरे गटाच्या नेत्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणीला भाजपाचे संघटनात्मक ‘बळ’, संघटनात्मक बदलांमध्ये दोन विभाग : जिल्ह्याला दोन अध्यक्षपदाची निर्मिती?