नाशिक : आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, त्याचाही आम्हाला गर्व आहे. ब्राह्मण बुद्धिजीवी आहेत, ब्राह्मण लोकांना मार्केटिंग जमत नाही, पण जे काम करत जातो त्यातून आमच्या कामाची प्रचिती येते, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस नाशिकमध्ये आयोजित केलेल्या ब्राह्मण समाजाच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
ब्राह्मण महापुरूष होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात भरपूर मोठं काम केलं. पण सध्या ब्राह्मण समाजाला मार्केटिंग जमत नाही आपल्या वाट्याला आलेलं काम ब्राह्मण इमाने इतबारे करतात. तसेच अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या मागण्याविषयी मी सकारात्मक असल्याचं सांगत महासंघाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभे असल्याचंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
ज्या नाशिक नगरीत दरवेळई वाईटाचा नाश केला. प्रभुरामचंद्काच्या पदस्पर्शाने पावन या नाशिकनगरीत येऊन मी खरोखर धन्य झाले. अखील भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ यांच्याशी काही वर्षांपासून माझे बोलणे सुरू आहे. जात, धर्म वेगळा ठेवून महासंघ लोकांमध्ये जाऊन काम करतो. महासंघ केवळ समाजासाठी नव्हे तर प्रत्येक समाजात काम करताहेत. कोरोनातही पुढे येउन जात, धर्माचा विचार न करता महासंघाने काम केले. समाजाचे काही प्रश्न असतील तर ते मिटले पाहिजे. समाजाच्या इमारत बांधण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यात कोणी अडचण निर्माण करत असेल तर सांगा अधिकाऱ्यांना टाईट करू, असही अमृता फडणवीस म्हणाल्या.
अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ यांच्याशी काही वर्षांपासून माझे बोलणे सुरू आहे. जात, धर्म वेगळा ठेवून महासंघ काम करतं म्हणत अमृता फडणवीसांनी महासंघाचं कौतुकही केलं.