शांतसिंग राजपूत आत्महत्येचं गूढ दिवसोंदिवस वाढत आहेत. यात अनेक राजकीय दिग्गजांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. याच विषयावर विवादित संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना त्यांना धमकी दिल्याच बोललं जात आहे तसेच त्यांचा एकेरी उल्लेख देखील केल्याचे समोर आले आहे.
या चर्चेत बोलत असताना अर्णब यांनी पुढच्या चर्चेत बघून घेईन असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमकी दिली आहे. अर्णब गोस्वामी पत्रकारितेच्या सर्व सीमारेषा ओलांडल्या असून, तो स्वतःच्या चॅनेल फक्त विशिष्ट लोकांच्या इशाऱ्यावर चालवत असल्याचा थेट आरॊप त्यांच्यावर होत आहे.
दरम्यान मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे , ,आम्ही दोषींवर कारवाई करू , कोणीही या प्रकरणाचा राजकारण करू नये तसेच या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासाठी करू नका , असे उद्धव ठाकरे म्हणाले.