पुणे : राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चांगलाच शाब्दीक वाद रंगला आहे. आज (७ जून) पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी या वादावर पुन्हा भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाहीत. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणे भाग असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते भाजप बद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलले तर मी शांत बसणार नाही, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना यावेळी त्यांना सरकार पडले म्हणून अजित पवार यांच्यावर राग आहे का असा प्रश्ना पाटील यांना विचारला असता पाटील म्हणाले की, माझा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राग सरकार पडले म्हणून अजित पवारांवर नाही. आमचा राग शिवसेनेने दगा दिला त्यामुळे शिवसेनेवर आहे, असे पाटील म्हणाले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं होतं.
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवारांनी मराठा आरक्षणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सुनावलं आहे. अजित हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता,” अशा शब्दात पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ”जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.
Read Also :
- सरकार काही जात नाही, फडणवीस तुम्ही सरकार पडण्याची वाटच बघा – एकनाथ खडसे
- नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; खडसेच्या टिकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
- मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटणार
- .‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती