मुंबई : मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने आता आरोपपत्र दाखल केले असून, यात सचिन वाझे सोबत १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आले आहेत. मात्र यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती प्राप्त होत असून, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी देशमुख यांनी २ कोटी रुपये मागितले असल्याचा मोठा खुलासा, सचिन वाझेने केल्याचे सांगितले जात आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात काय चालू, काय बंद?
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाझेसोबत देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे. मुंबईतल्या बार मालकांकडून वसुली केल्याच्या प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आलेले आहे. याप्रकरणी काही शे कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा देखील तपास यंत्रणेला संशय आहे. अशातच आता वाझेने ईडीकडे मोठे खुलासे केल्याचे सांगितले जात आहे. पवारांचा वाझेला पोलीस दलात परत घेण्याला विरोध होता. पण त्यांच्या राजी होण्यासाठी देशमुखांनी २ कोटी मागितले असल्याचे वाझेने सांगितले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
तसेच, जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या बदलीचे आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. यावर देशमुख आणि अनिल परब नाराज होते. त्यांनी आदेश माघारी घेतला, असे वाझेने सांगितले आहे. त्यांनतर ३-४ दिवसांनी कळले, पैश्यांच्या आणि इतर काही तडजोडींनंतर हे आदेश जारी करण्यात आले. यात पोलीस अधिकाऱ्यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते,’ असा दावा वाझेने केला आहे.
संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
४० पैकी २० कोटी पलांडे यांच्याकडून देशमुखांना तर, २० कोटी RTO अधिकारी बजरंग करमाटे यांच्याकडून परब यांना देण्यात आले. देशमुख, वाझेला त्यांच्या कार्यालयात, घरी, राज्य अतिथीगृहात बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट सूचना देत असत, असेही वाझेने म्हटले आहे. तसेच, देशमुखांनी प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे सांगत, १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी दिली होती. त्यानुसार वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ४.७ कोटी रुपये गोळा केले होते,’ असा देखील खुलासा वाझेने केला आहे.
Read Also :
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांनी दिली सूचक प्रतिक्रिया
- ‘मुख्यमंत्री भर सभेत माझ्या कानात म्हणाले…’, दानवेंचा गौप्यस्फोट
- ‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी